HARI OM
Friday, December 24, 2010
वास्तूबाधा विषयी प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात काही महत्वाचे points सागितले
वास्तूबाधा विषयी सागताना प.पू. बापूंनी २३ -१२ २०१० च्या प्रवचनात काही महत्वाचे points सागितले :
१) स्वतःच्या घरात कधीही दक्षिणेकडे पाय करून झोपू नये .
२) तुमच्या घरात कोणीही मनुष्य बाहेरून आत आला की प्रथम त्याला तुमच्या देवाचा /सद्गुरूंचा फोटो दिसलाच पाहिजे .(ह्यामुळे जर कोणी मनुष्य वाईट हेतू घेयून तुमच्या घरात प्रवेश करत असेल तर त्याचे विखार (वाईट विचार ) तुमचा देव स्वत:कडे घेतो .)
३) किचन मध्ये तुमच्या शेगडीच्या विरुद्ध (समोरच्या बाजूस तुमच्या देवाचा फोटो असलाच पाहिजे .
ह्यामुळे तुमच्या घरात जे अन्न शिजते ते तुमच्या देवाच्या नजरेखाली बनते.
४) तुमच्या बाथरूम मध्ये नळाच्या वरती कुंकू/हळद/अष्टगंध ह्याने रोज स्वस्तिक काढावा. तो paint करून घेयू नये . तर रोज हाताने काढणे आवश्यक आहे.
जर शौचालय व बाथरूम एकत्र असेल तर शौचालायापासून दूर नळाच्या वर स्वस्तिक काढावा .
५) रोजची अंघोळ म्हणजे स्वत: स्वत:ला अभिषेक करणे म्हणून रोजची आंघोळ करताना सद्गुरूंचे नामस्मरण करावे .(ॐ ग्लौम अनिरुद्धाय नम: )
**** तुमच्या राहत्या घरात जर वास्तू बाधा आहे असे जाणवत असेल तर पुढील तीन महत्वाच्या गोष्ठी प.पू.बापूंनी करण्यास सांगितल्या .
१) कुठल्याही एका मंगळवारी आदिमाता चंडीकेचा फोटो हृदयाशी डाव्या बाजूला धरून श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणत दिवसाच्या आठ भागात प्रत्येक वेळी कमीत कमी ६ मिनिटे घरात फिरावे . ( दिवसाचे आठ भाग म्हणजे रात्री ११.३० ते दुसर्या दिवशी रात्री ११.३० पर्यंतचा काळ .ह्या काळाला ८ भागात विभागणे म्हणजे ३ तासाचा एक भाग होतो. ह्या एका भागात ६ मिनिटे असे ८ वेळा म्हणजे ४८ मिनिटे वर सांगितल्या प्रमाणे श्री गुरूक्षेत्रम मंत्र म्हणावा .( ** असा मंत्र म्हणताना त्या मंगळवारी घरात कोणाचा वाढदिवस नसावा व तो दिवस अमावास्येचा नसावा )
२) घराला जर भूत किवा अन्य कुठली बाधा जाणवत असेल तर कुठल्याही पौर्णिमेच्या दिवशी डाव्या हातात उदीचे भांडे घेवून उजव्या हाताने घराच्या उंबरठ्यापासून "श्री गुरू" (continue) मंत्र म्हणत उदी लावायला सुरुवात करावी .व सगळी कडे भिंती , कपाटे ,बाथरूम प्रत्येक ठिकाणी घरात उदी लावत जावे . उदी लावण्याचा काळ पौर्णिमा जेव्हा सुरु होते व जेव्हा संपते ह्या मधलाच असावा . ही गोष्ट वर्षातून एकदा केली तरी चालते .
३) तिसरी महत्वाची वास्तू बाधानाशक गोष्ट म्हणजे प्रपत्ती ..श्री रण चंडिका प्रपत्ती व श्री मंगल चंडिका प्रपत्ती .
" तुमची स्वत:ला जेवढी खात्री नसेल तेवढी मला तुमची खात्री आहे ..तुमचे दोष मी मोजत नाही तर तुमचे गुण मी मोजतो ". --- प.पू. सदगुरू श्री अनिरुद्ध बापू
----- ( श्री हरि गुरु ग्राम येथील प्रवचन ..२३-१२-२०१० )
च्या प्रवचनात काही महत्वाचे points सागितले
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment