HARI OM

HARI OM

Thursday, April 7, 2011

श्री हरीगुरुग्राम प्रवचन दिनांक - ०३-०३-२०११ हरी ओम !!!!

श्री हरीगुरुग्राम प्रवचन दिनांक - ०३-०३-२०११


हरी ओम !!!!

मागील प्रवचनात बापू आपल्या मोठ्या आईच्या "क्षमा " या नावावर बोलत होते.

या वेळी पण बापू त्यावरच बोलत होते..... बापू म्हणाले मी या नामावर जेवढे बोलेन नां तेवढे कमीच आहे अगदी युगानुयुगे मी यावर बोलत राहीन..... तरीही संपणार नाही माझ्या आईची महती....



बापू नि १ उदाहरण दिले ... समजा 'X' नावाची १ स्त्री आहे ती आपल्या वडिलांसाठी मुलगी आहे, पतीसाठी प्रेयसी आहे, मुलांसाठी माता आहे, सासुसाठी सून आहे, नणंदेसाठी वहिनी आहे,वहिनी साठी नणंद आहे ... अशी खूप काही नाती सांगितली बापूनी .....

त्याचप्रमाणे "सत्ता" हि सुद्धा स्त्रीलिंगी आहे, बापूनी इतर कोणती सत्ता नव्हे तर फक्त वैश्विक सत्तेबद्दल सांगितले, कि जी सत्ता विश्वावर नियंत्रण ठेवते ती वैश्विक सत्ता आणि ती सत्ता म्हणजेच आपली - "आदिमाता'......

बापूनी यावेळी तीन मार्गांचा उल्लेख केला

१. वैदिकमार्ग

२.भक्तीमार्ग

३.तंत्रमार्ग

यापैकी वैदिकमार्ग आणि भक्तिमार्ग एकमेकांना जवळचे आहेत. वैदिकमार्गातून भक्तिमार्ग मिळतो.

तर तंत्रमार्ग म्हणजेच वैदिकमार्गातील तंत्रांचा - गणितांचा रुक्ष उपयोग करून तयार झालेला मार्ग, बापू सांगतात कि साध्या माणसाची गणिते नेहमी चुकतात....

तंत्र मार्गात आदिमातेला आदिमाता न मानता आदिसत्ता मानतात आणि त्याच सत्तेचे रुक्ष असे गणित मांडले जाते.....

वैदिक मार्ग, भक्तिमार्ग आणि तंत्रमार्ग यांचे सविस्तर वर्णन करताना बाप्पाने हिमालय पर्वत, त्यातून निघणारी गंगा (TRIPATHGAMINI) आणि बर्फाची factory याचे उदाहरण दिले.

बापू सांगतात वैदिक मार्ग म्हणजे - हिमालय, भक्तिमार्ग म्हणजे त्यातून निघणारी गंगा जी सर्व पाप नाहीसे करून पवित्र करते, तर बर्फ तयार होणारी factory म्हणजेच तंत्रमार्ग .....

हिमालयात जेवढा बर्फ आहे तेवढा बर्फाच्या फाक्टरी मध्ये तयार होऊ शकतो पण त्यातून ती पावन गंगा कधीच वाही शकत नाही......



बापू सांगतात हि जी महाविष्णूच्या चरणकमळातून निघणारी गंगा आहे ती आदिमातेच्या क्षमेचा १ अंश इतकी आहे.

(यावरूनच विचार करा कि आदिमातेकडे किती क्षमा असेल?)

तर अंश म्हणजे नेमके काय?

e.g. पृथ्वीवर जेवढे काही समुद्र, नद्या वगेरे आहेत ते म्हणजे संपूर्ण जल तत्वाचा १ अंश इतके आहे म्हणजेच 'अंश' म्हणजे १ परिमाण.

आणि जलतत्त्व म्हणजेच 'अंशी' आहे.

यावरूनच कळते कि जर ती गंगा माता आपल्या मोठ्या आईचा १ अंश (क्षमा) असेल तर आपल्या आदिमातेकडे किती क्षमा आहे.

बापू सांगतात हे अंश आणि अंशी यामधील फरक एका आदिवासी भजनामध्ये अगदी सरळ आणि सोप्या भाषेत मांडला आहे...

"सूर्य जो सर्वाना प्रकाश देतो आणि जेवढे काही प्रकाशीत करतो अगदी शेवटच्या टोकापर्यंत तेवढे म्हणजे 'भगवंत' आणि जेवढे सूर्यकिरण आपल्या डोळ्यात जातात तेवढे म्हणजे 'मानव' या वरूनच समजते कि मानव म्हणजेच 'अंश' (भगवंताचा) आणि भगवंत म्हणजे 'अंशी' (मानवाचा)..."



तर आपल्या आदिमातेचे खरे नाव "क्षमा" हेच आहे बाकी सर्व नावे या नावाचा "अंश" आहेत.



स्त्रीकडे क्षमेची खूप मोठी ताकद असते कारण आदिमातेने 'क्षमा' स्वरूप धारण केले आहे.



"तिच्या एवढी क्षमा कोणाकडेही नाही....."



बापू सांगतात पती आणि पत्नी यामध्ये पत्नी शिवाय कोणतेच मंगल कार्य पूर्ण होत नाही. पती जेव्हा १०० ग्राम पुण्य करतो त्यावेळी त्यातले ५० ग्राम पतीचे कमी न होता पत्नीला मिळत असते. जर त्या दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम असेल तर ५० ग्राम पेक्षाही जास्तच मिळते.



"प्रत्येक पत्नीसाठी आपला पती हा देव असलाच पाहिजे आणि असतोच ..."



आणि पतीनेसुद्धा देवासारखे वागलेच पाहिजे, प्रत्येक पतीला आपल्या पतीचा आधार बनता आलेच पाहिजे,

कारण जेव्हा पतीचा आधार असतो तेव्हा पत्नी अगदी काठीनातला कठीण प्रसंगातून सुद्धा तरुण नेते.. कारण तिच्याकडे क्षमा असते.



पृथ्वीकडे पण क्षमा असते ... तिचे नावच मुळी क्षमा आहे... आपण तिला लाथा मारतो, तिच्यात नांगर खुपसतो किती काही काही करतो

पण तरीही ती आपल्याला अन्न, जल देतच असते ती कधीच रागवत नाही....



ज्याप्रमाणे आदिमातेने 'क्षमा' हे रूप धारण केले आणि स्त्री मध्ये तेच क्षमा तत्व / गुणधर्म आले, त्याचप्रमाणे शिवाचा गुणधर्म म्हणजेच "आधार" हा पुरुषांमध्ये असतो. महाविष्णू हा नेहमी गती देत असतो तर शिव हा नेहमी आधार देत असतो.



आधाराशिवाय काही होऊ शकत नाही.



सर्वाना आधार देणे आणि व्यवस्थित ठेवणे हे काम गुरुतत्वाचे आहे.



स्त्रीने तिचे क्षमातत्व आणि पुरुषाने त्याचे आधारतत्व जोपासले पाहिजे. ज्यावेळी हे स्त्रीचे क्षमातत्व आणि पुरुषाचे आधारतत्व एकत्र येते त्यावेळी तो संसार अगदी सुखाचा होतो..

क्षमा हाच मोठा आधार आहे आणि खरा आधार क्षमाच देऊ शकते. म्हणूनच तर शिवाने अर्धनारीनटेश्वराचे रूप धारण केले.



स्त्री आणि पुरुष हे आदिमातेनेच निर्माण केले.



आद्य स्त्री आणि पुरुषजोडपे - म्हणजेच - महाशिव-पार्वती, महाब्रम्हा-सरस्वती आणि महाविष्णू - लक्ष्मी हे आदिमातेनेच तयार केले, त्यांच्यावर वैदिक संस्कारहि आदिमातेनेच घडवले, त्यातूनच प्रजोत्पत्ती झाली तेही आदिमातेच्याच प्रेरणेतून घडून आले.

एवढेच नव्हे तर त्या आदिमातेने मानवी रुपात अनसूया आणि अत्री हि दोन्हीही रूपे धारण करून आईने मानवी जीवनातील प्रत्येक संस्कार प्रत्येक व्यवहार करून दाखवला.

तर अशी हि आपली आई कि जीने आपल्याला सर्व काही शिकवले.

आणि तिच्याइतकी क्षमा कोणाकडेही नाही हे पाहण्यासाठी बापूनी सांगितले कि सद्गुरूच्या फोटोपुढे १० मिनिटे डोळे बंद करून बसा आणि आपण लहानपणापासून केलेल्या सर्व चुका आठवा. बापू म्हणाले १० मिनिटे पण तुम्ही बसू शकणार नाही....

आणि मगच तुम्हाला कळेल कि आपली हि आई आपल्याला किती क्षमा करते ते......



बापू म्हणतात मी कोण आहे? मला माझ्या आईने कशाला पाठवले आहे?



तिने बापूला पाठवले आहे ते फक्त तिची क्षमा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी...

बापू म्हणतात पाहिजे तर मला माझ्या आईचा पोस्टमन म्हणा.....

मी क्षमा करत नाही ... माझा तो गुणधर्म नाही.... माझा गुणधर्म आहे तो आधार....

क्षमा फक्त माझी आईच करू शकते....

बापू म्हणतात "मी माझ्या आईची पोस्टाची पेटी , पोस्टाचे ऑफिस आहे..."

तिला जे तुमच्या पर्यंत पोहोचवायचे आहे ते ती त्यात टाकते आणि ते तुम्हाला माझ्याकडून मिळते म्हणन मी फक्त माझ्या आईची पोस्टाची पेटी आहे.



आईची क्षमा सांगताना बापूनी सत्ययुगातील १ गोष्ट सांगितली....

सत्ययुगाच्या शेवटच्या भागात वैखानर नावाचा १ ऋषी होता. त्याने परमशिवाची घनघोर तपश्चर्या केली आणि खूप ताकद मिळवली. त्याला वाटले आपण परमशिवा एवढे ताकदवान झालो तर त्या पेक्षा जास्त ताकद आदिमातेची आहे तर तिला मात देण्यासाठी व तिच्या एवढी ताकद मिळवण्यासाठी त्याने आदिमातेची घनघोर तपश्चर्या करायला सुरुवात केली. त्याची तपश्चर्या पूर्ण होण्या आधीच आई त्याच्या वर प्रसन्न झाली. त्याने आईकडे वर मागितला कि मला तुझ्या तुल्यबळ व्हायचे आहे. आईने सांगितले तुला अजून तपश्चर्या करावी लागेल त्याप्रमाणे त्याने केली, आई पुन्हा प्रकट झाली पुन्हा त्याने तेच मागितले, आईने त्याला समजावले कि तुला कळतंय का? कि तेव्हा काय होईल? तुला माझी जागा घ्यायची आहे का?

त्याने उत्तर दिले नाही... मला तुझ्याही पुढे जायचे आहे....

त्यावेळी आईने सांगितले मग अजून तपश्चर्या कर त्याने केली आई पुन्हा प्रकट झाली, पुन्हा तेच...

आईने त्याला १ दिवस आणि १ रात्री साठी आईने तिची सर्व ताकद दिली.

ती ताकद प्राप्त होताच आईएवढे पावित्र्य त्याला प्राप्त होते आणि तेव्हा तो सर्व जगाचा नाश करतो, हा वाईट तो वाईट , ती वाईट असे करत करत सर्व जगाचा तो नाश करती आणि सर्व जगाचा नाश आपण केला म्हणून तो स्वताचा नाश करायला जातो तोच ती करुणामयी पुन्हा प्रकट होते आणि म्हणते थांब बाला काय करतो आहेस?

हे जे काही झाले ते स्वप्न होते मूल असे काहीच झाले नाही....

हे सर्व का झाले तर तुझ्याकडे क्षमा नाही आधी क्षमा मिळव आणि नंतर ताकद मिळव कारण क्षमा मिळाली तरच ताकद मिळते.

यावरूनच समजेल आपल्याला कि आई किती क्षमा करते आपल्या प्रत्येकाला.....

या साठीच आपल्याला शत्रुघ्नेश्वरी पूजन करायचे आहे प्रसंनोत्सवाच्या वेळी...

त्या वेळी आपल्याला आपल्या आईला सांगायचे आहे कि..

"देवी (आई), तू आमच्या शत्रूंचा अशा रीतीने नाश कर कि त्यांच्यापासून आम्हाला त्रास होणार नाही आणि त्यांचे पण चांगले होईल."



बापू म्हणाले....

बाळानो "ती क्षमाशील आहे" हे म्हणायला चूक करू नका, विसरू नका.



बापूचे सगळे शब्द विसरलात तरी चालेल .



"पण आदिमाता म्हनजेच ULTIMATE क्षमा हे कधीच विसरू नका......."



म्हणूनच आईचे क्षमा हे नाव अंशी आहे आणि बाकी सर्व नवे अंश आहेत.......



हरी ओम!!!!



बाप्पा यात काही चुकले असेल तर श्री राम........

No comments:

Post a Comment